Sultan, Shahenshah, and Badshah: इस्लामिक कालखंड म्हणजेच मुघल कालखंड अशी सर्वसाधारण धारणा आहे. म्हणूनच भारतीय राजकारणातही इस्लामिक कालखंडाचा उल्लेख मुघल कालखंड म्हणूनच करण्यात येतो. परंतु, ज्या इस्लामिक राजवटींनी भारतावर राज्य केले त्यांचे मूळ लक्षात घेतले तर, त्यांच्यातील भिन्नता सहज लक्षात येण्यासारखी आहे. मुघलांचे मूळ मंगोलियन होते, तर भारतातील पूर्वीच्या मुस्लीम शासकांचे मूळ तुर्की (घुरीद, मामलुक, खिलजी, तुघलक) आणि अफगाण (लोदी, सूरी) होते. मुघल हे पर्शियातील शाही दरबारातील रितीभातींचे पालन करत होते, तर तुर्क आणि अफगाण यांसारख्या आदिवासी टोळ्या समतावादी अरब पद्धतींना प्राधान्य देत होत्या.

भारतात मुस्लिम राजवटींचे अस्तित्त्व एकसंघ मानले जाते. परंतु, या राजवटी कधीच एकसंघ नव्हत्या. अरबस्तानात इस्लामिक जगाचा उदय झालेला असला तरी सांस्कृतिकदृष्ट्या पर्शिया अधिक समृद्ध होते. पर्शियन लोकांना इस्लामपूर्व कालखंडापासून मोठी राज्ये आणि राजवंशांचा समृद्ध इतिहास आहे. पर्शियात रक्तवंशाला महत्त्व दिले जाते. म्हणूनच बहुतेक मुस्लीम शिया आहेत. त्यांच्या समुदायात वंशपरंपरागत गुरूंच्या अनेक शाखा आढळतात. या गुरूंची थडगी उभारली गेली होती. अरब मात्र मुख्यतः सुन्नी असतात आणि ते वंशपरंपरेला विशेष महत्त्व देत नाहीत. ते कला, स्थापत्य आणि सौंदर्याविषयी अलिप्त आहेत. म्हणूनच त्यांनी थडगी बांधण्याची परंपरा नाकारलेली आहे.

अरबस्तानच्या खूप आधी पर्शियामध्ये झोरास्ट्रियन धर्म आणि मनिचाई धर्माच्या स्वरूपात एकेश्वरवाद अस्तित्त्वात होता. परंतु, इसवी सनाच्या ७ व्या शतकापासून ते ९ व्या शतकापर्यंत इस्लामचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. हा कालखंड सेंच्युरी ऑफ सायलेन्स म्हणून ओळखला जातो. या कालखंडात प्राचीन पारसी संस्कृतीचे निर्दयीपणे इस्लामी संस्कृतीत परिवर्तन करण्यात आले.

८ व्या शतकात बगदादच्या अब्बासी खलिफांच्या उदयाबरोबर पर्शिया अरबी सामर्थ्याला आव्हान देणारे म्हणून उदयास आले. इसवी सन १००० च्या सुमारास भारताला लुटणारा मध्य आशियातील हल्लेखोर गझनीच्या महमूदच्या उदयाबरोबर हा प्रांत आणखी शक्तिशाली झाला. गझनी हा कवी फिरदौसीचा आश्रयदाता होता. कवी फिरदौसीने शाहनामेह किंवा पर्शियन बुक ऑफ किंग्ज लिहिले. शाहनामेह हा इस्लामपूर्व पर्शियाची माहिती देणारा एकमेव स्मृतीग्रंथ होता.

‘Gunpowder’ kingdoms

मध्य आशियातून म्हणजेच पर्शियाच्या पूर्वेकडून आलेले तुर्क हे आधुनिक तुर्कस्तान म्हणजे पर्शियाच्या पश्चिमेला असलेल्या तुर्कस्तानमध्ये ऑटोमन साम्राज्य निर्माण करण्यासाठी स्थलांतरित झाले. त्यांनी इजिप्तच्या मामलुकांचा पराभव केला. १६०० नंतर जगावर तुर्कस्तानचे ऑट्टोमन, पर्शियाचे सफाविद आणि भारतातील मुघल या तीन मुस्लिम राजवटींचे वर्चस्व होते.

ओटोमन लोक स्वतःला खलिफाचे वारसदार मानत होते तर, सफविद लोक सूफी गुरु आणि शिया जीवनपद्धतींकडे आकर्षित झाले होते. मुघल पर्शियन शब्दसंग्रह वापरून स्वतःला बादशाह (जगाचा सम्राट) आणि शहेनशाह (राजांचा राजा) म्हणत असतं. मुघलांनी स्वतःला खलिफाला महत्त्व देणाऱ्या पूर्वीच्या तुर्की सुलतानपेक्षा वेगळे केले. इल्तमुश या एकमेव दिल्लीच्या सम्राटाने खलिफाकडून अधिकृत मान्यता मिळवण्याची मागणी केली होती.

भारतातील सुलतान आणि बादशाह दोघांनाही राजघराण्यातील सदस्यांसाठी भव्य थडगी बांधायला आवडत होते. याची सुरुवात इल्तमुशपासून झाली. थडग्यांची वास्तुशैली ही मशिद आणि दर्ग्यांच्या स्थापत्यकलेशी स्पर्धा करणारी होती.

थडगी बांधणं ही एक पर्शियन प्रथा होती. पर्शियामध्ये बांधलेली सर्वात जुनी थडगी गोनबाद-ए कावुस (Gonbad-e Kavus) (इ.स. १००० ) मध्ये सापडतात. या थडग्याची प्रेरणा कदाचित प्राचीन अकेमिनाईड राजांच्या (इ.स.पू.५००) थडग्यांपासून घेतली गेली होती. मुघलांनी झोरास्ट्रियन आकाश दफनं (Sky burial) आणि इस्लामिक जमिनीच्या आत दफनं करण्याच्या पद्धतींना आव्हान दिले. मुघल सम्राट औरंगजेब हा एकमेव अपवाद होता; त्याने स्वतःसाठी थडगं बांधण्याचे टाळले आणि इस्लामिक पद्धतीच्या दफन पद्धतीची निवड केली.

भारतातील इस्लामी राजवटीचे तीन टप्पे

भारतातील इस्लामी राजवट तीन टप्प्यात विभागली जाऊ शकते. पहिला टप्पा दहाव्या ते बाराव्या शतकातील होता. हा कालखंड मुख्यतः छाप्यांचा काळ होता. या कालखंडात गझनीच्या महमूद (पूर्व अफगाणिस्तानातील) सारख्या तुर्की सरदारांनी भारतात प्रवेश केला. त्यांनी सत्ताकेंद्र आणि आर्थिक सुबत्ता असलेल्या शहरांची लूट करण्यासाठी निवड केली, विशेषतः ते मंदिरांवर हल्ला करत असत. यामुळे भारतातून चांदीचा मोठा ओघ येत असे.

दुसरा टप्पा बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला, या कालखंडात सुलतानतांची स्थापना झाली आणि त्याची सुरुवात घुरीद सुलतानतपासून झाली. घुरीद हे मध्य आशियातील ताजिक होते. या काळात दिल्लीमध्ये कुतुब मिनारचे बांधकाम झाले आणि अफगाणिस्तानमध्ये याच काळात ‘मिनार ए जाम’ हा मिनार उभारला गेला. हे दोन्ही मनोरे एका महान साम्राज्याच्या दोन टोकांचे प्रतीक होते, ज्यावर गियासुद्दीन घोरी आणि मुईझुद्दीन मोहम्मद घोरी या दोन भावांनी राज्य केले होते.

यानंतर मामलूक सुलतानांची सत्ता आली. हे मामलूक मूळचे तुर्की प्रदेशातील होते, पण ताजिकांचे गुलाम म्हणून ओळखले जात. त्यांच्या पश्चात खल्जी आणि तुघलक राजवंश आले. हे दोन्ही राजवंश मध्य आशियातून आले होते. त्यानंतर अफगाणिस्तानातील पठाण भागातून आलेले लोदी आणि सूरी हे सत्तेवर आले. या सर्व सुलतानांनी अरबी राजेशाहीच्या आदर्शांचे अनुकरण केले आणि बगदाद (इराक) येथील तत्कालीन खिलाफतच्या समर्थनावर त्यांची सत्ता अवलंबून होती.

बाबरला पर्शियन पदव्या का आवडत होत्या?

खलिफाची स्थापना मदीना येथे झाली होती. नंतर, त्यांचे स्थलानंतर सीरियातील दमास्कस येथे झाले. अखेर ते ८ व्या शतकात बगदाद मध्ये स्थायिक झाले, तेथे त्यांची पुढील ५०० वर्षे भरभराट झाली. परंतु, १३ व्या शतकात मंगोलानी बगदादचा नाश केला. मंगोल लोकांनी पंजाबच्या अनेक भागांवर आक्रमण केले. परंतु खिलजींच्या तीव्र प्रतिकारामुळे आणि चंगेज खानला पडलेल्या एकशिंगी गेंड्याच्या स्वप्नामुळे त्याला पंजाबकडे पाठ फिरवण्यास सांगण्यात आले.

परंतु, शंभर वर्षांनंतर, १३९९ साली मंगोल वंशाच्या उझबेक तामेरलेनने दिल्लीवर आक्रमण केले आणि दिल्ली लुटली. त्यामुळे इस्लामिक राजवटीच्या रचनेत बदल झाला. तामेरलेन हे पर्शियन नाव तैमूर-अल-लांगचे इंग्रजी रूप आहे. ज्याचा अर्थ लोखंड, लंगडा असा होतो.

बाबर हा त्याच्या वडिलांच्या बाजूने तैमुरी होता आणि त्याच्या आईच्या बाजूने तो मंगोल खान, चंगेज खानशी जोडला गेला होता. त्याने भारतात आणलेल्या चार- बागांच्या लँडस्केप गार्डनवरील त्याच्या प्रेमावरून तो पर्शियन संस्कृतीने खूप प्रभावित झाला होता असे दिसते. परिणामी, सुलतान ही पदवी स्वीकारण्याऐवजी त्याने आणि त्याच्या वंशजांनी बादशाह (शासक) आणि शहेनशाह (राजांचा राजा) अशा पर्शियन पदव्या पसंत केल्या.

विषयाशी संबंधित प्रश्न

भारतात इस्लामिक कालखंडाला मुघल कालखंड संबोधण्याची पद्धत आहे; यावर सविस्तर टीप लिहा.

इस्लामच्या प्रारंभिक प्रसारानंतर बगदादच्या अब्बासी खलिफांनी पर्शियन प्रभावाचे पुनरुज्जीवन कसे केले?

१६०० नंतर, जगावर तुर्कीचे ओटोमन, पर्शियाचे सफाविद आणि भारतातील मुघल या तीन मुस्लिम राजवटींचे वर्चस्व होते; ते एकमेकांपासून कसे वेगळे होते?

भारतातील इस्लामिक राजवट तीन टप्प्यात कशी विभागली जाऊ शकते? १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात घुरीद सल्तनतच्या रचनेत कसा बदल झाला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुलतान ही पदवी स्वीकारण्याऐवजी, बाबर आणि त्याच्या वंशजांनी बादशाह (शासक) आणि शहेनशाह (राजांचा राजा) यासारख्या पर्शियन पदव्या का पसंत केल्या?