10ऋतू बदलल्यास त्वचेवर त्याचा परिणाम होतो. त्वचेला आरोग्यदायी आणि तजेलदार ठेवणे, हे खरे तर कोणत्याही एका ऋतूतील नव्हे, तर वर्षभराचे काम आहे. प्रखर सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे याला प्राधान्यक्रम असला तरी ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या बदलांमुळे त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धतीत काही बदल करावे लागतात. शरद ऋतू म्हणजे उन्हाळय़ाकडून हिवाळय़ाकडे संक्रमण. या काळात त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्याबरोबरच त्वचेचे संरक्षण करण्याची आवश्यकता असते. हवेतील गारवा जसजसा वाढत जातो, त्याचबरोबर वातावरणातील हे बदल आपली त्वचा नेहमीपेक्षा अधिक आकसते आणि कोरडी होत जाते. शरद ऋतूत त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स..
आहारातील बदल : तुमच्या पोषक आहारात भरपूर जीवनसत्त्वे असलेली हिवाळय़ातील फळे, त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी भरपूर प्रमाणात हर्बल टी, फळांचे रस आणि पाणी आणि नियमित व्यायाम यांचा समावेश असल्यास तुमची त्वचा तजेलदार आणि सुंदर होण्यास मदत होईल.

फेशिअल्स, क्लिनअप्स : नियमितपणे फेशिअल्स केल्यास त्वचा वातावरण बदलांसाठी तयार होते. आरोग्यदायी त्वचेसाठी ही योग्य पायाभरणी आहे. उन्हाळा संपता संपता त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यासाठी आणि मसाजच्या माध्यमातून त्वचेला पुनरुज्जीवित करण्यासाठी हायड्रेटिंग फेशिअल करून घेणे गरजेचे आहे.

स्कीन केअर उत्पादने : ही सगळय़ात महत्त्वाची पायरी आहे. क्लिन्झरपासून डे आणि नाइट क्रीमपर्यंत.. ऋतू बदलला किंवा तुम्ही वेगळय़ाच ठिकाणी प्रवासाला जात असाल तर यातील प्रत्येक वस्तू बदलते. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी कोणती उत्पादने योग्य आहेत, हे जाणून घेण्यासाठी कृपया तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांना भेटा. ऋतूप्रमाणे स्कीन केअर उत्पादने बदलतात. इतकेच नाही तर तुम्ही कोणत्या शहरात आणि देशात राहात आहात, यावरही ती अवलंबून असतात.

मेकअप आणि सौंदर्यप्रसाधने : त्वचेसाठीच्या उत्पादनांप्रमाणेच मेकअपचे साहित्यही बऱ्याचअंशी ऋतूवर अवलंबून असते. हिवाळा म्हणजे अधिक माइश्चराइज्ड आणि क्रीम बेस्ड मेकअपचा काळ, तर उन्हाळा म्हणजे मिनरल मेकअप आणि पाण्याने वाहून न जाणारा मेकअप वापरण्याचा काळ.

शरद ऋतूतील त्वचेची खास काळजी
जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.
सनस्क्रीनला विसरू नका : आतापर्यंत तुम्हा सगळय़ांच्या हे लक्षात आलेच असेल की सनस्क्रीन थंडीच्या महिन्यांमध्येही आणि घरात आणि घराबाहेरही आवश्यक असते. ३० एसपीएफपेक्षा अधिक क्षमतेची कोणतीही उत्पादने वापरता येतील.

हातापायांचे लाड करा : हातापायांसाठी असलेले खास क्रीम वापरा, ग्लोव्हज् आणि सॉक्स घाला आणि नियमितपणे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घ्या.
 बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करू नका : थंडीच्या दिवसांत आपण सगळेच गरम पाण्याने सुखावतो. मात्र गरम पाण्यामुळे त्वचेवरील नसíगक घटक निघून जातात, ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी बनत जाते, हे लक्षात ठेवा. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा आणि थोडक्यात आंघोळ आवरा.
तुमच्या अंतर्मनातील शांतता आणि बाहेरील जग यांच्या ताळमेळाचे प्रतििबब आपल्या त्वचेवर पडत असते. त्यामुळे योग्य प्रमाणात झोप घेऊन ताजेतवाने होण्याचा प्रयत्न करा, स्पामध्ये वेळ घालवा आणि तुमच्या प्रिय व्यक्तींसह नियमितपणे सुट्टीवर जा. यामुळे तुमची त्वचाही तुमचे आभार मानेल आणि तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रेमात पडाल!!
डॉ. अप्रतिम गोयल
कॉस्मेटिक डर्मिटॉलॉजिस्ट एॅण्ड लेझर सर्जन.