|| दयानंद लिपारे
कालमर्यादा संपत आल्यावर पुरवठा :- कोल्हापूर : राज्यातील सेवाभावी रक्तपेढ्यांना शासनाकडून होणारा रक्त संकलन पिशव्यांचा पुरवठा हा अनियमित किंवा उशिरा होत आहे. गेल्या दोन वर्षांत ऐन करोना संसर्गाच्या काळात तर या पिशव्यांचा पुरवठाच न झाल्यामुळे या संस्थांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राज्यात रक्त संकलन करण्याचे काम शासकीय रुग्णालय, भारतीय रेड क्रॉस संस्था, स्वयंसेवी संस्था आणि गेल्या काही वर्षांत खासगी रक्तपेढी यांच्याकरवी केले जाते. यामध्ये दात्यांचे रक्त संकलन करण्यासाठी विशिष्ट पिशवी वापरली जाते. त्याला वैद्यकीय भाषेत ‘मदर बॅग’ असे संबोधले जाते. वर्षभर दात्यांकडून अंदाजे उपलब्ध होणाऱ्या रक्ताच्या प्रमाणात या पिशव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शासन एका वेळेसच खरेदी करते. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये वापर होऊन ज्या पिशव्या शिल्लक राहतात, त्यापैकी काही पिशव्या या सेवाभावी रक्तपेढ्यांना शासनाकडून पुरवल्या जातात. मात्र हा पुरवठा बहुतांश वेळा वर्षाअखेरीस होत असतो. अनेकदा तोवर या पिशव्यांची वापर कालमर्यादा (एक्सपायरी डेट) ही संपत आली असल्याने त्याचा वापर करणे अशक्य बनते. अनेकदा या पिशव्या टाकून द्याव्या लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर हा पुरवठा वर्षाच्या सुरुवातीपासूनच जर टप्प्याटप्प्याने केला तर तो या संस्थांना उपयोगी पडू शकतो, असे या संस्थाचालकांचे म्हणणे आहे. सध्या रक्ताची मोठी चणचण आहे, अशा वेळी हा साठा वाढवण्यासाठी या रक्तपेढ्यांना अशा प्रकारच्या सामग्रीचा सुरुवातीपासूनच योग्य पुरवठा केला, तर त्यातून रक्त संकलन वाढण्यास मोठी मदत होईल, असेही या संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood banks suffer from chaos in blood collection bag supply akp
First published on: 18-07-2021 at 00:03 IST