कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ठरल्याप्रमाणे गतवर्षीचे १०० रूपये थकीत बील तातडीने देणे संदर्भात शासनाने पावले उचलावीत. अन्यथा मुख्यमंत्र्याचे कोल्हापुरात १६ फेब्रुवारी रोजी काळे झेंडे दाखवून स्वागत करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला.

ऊस बिलासाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोली पुलावर चक्का जाम केले. गतवर्षी तुटलेल्या उसाचे थकीत बील १०० रूपये द्यावेत, तसेच ज्या साखर कारखान्यांनी ३००० च्या वर दिला आहे, त्यांनी ५० रूपये द्यावेत, असा लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते.

ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Yavatmal, Eknath Shinde, Ladki Bahin Yojana, Eknath Shinde Defends Ladki Bahin Yojana, Eknath Shinde criticises opposition, eknath shinde in yavatmal, opposition criticism, w
योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा….मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य
Aditya Thackeray
मविआ सत्तेत आल्यावर लुटारु मंत्री, अधिकाऱ्यांना कारागृहात टाकणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा
Ravikant Tupkar, Eknath Shinde,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर शेतकरी आत्महत्येचे… रविकांत तुपकर म्हणाले..
Ramdas Kadam, Ravindra Chavan,
रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यायला हवा, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका
minister hasan mushrif
नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

हेही वाचा – कोल्हापुरात जागतिक बँकेच्या पथकाची पूरप्रवण भागाची पाहणी

८ कारखान्यांचीच मान्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून साखर कारखाने पैसे देतील असे आश्वासन दिले होते. दोन महिने होत आले तरीही अद्याप अनेकांनी प्रस्ताव दाखल केला नाही. केवळ ८ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच काही साखर कारखान्यांनी बिले देत नाही सांगत नकाराची घंटा पसरवलेली आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द आम्ही मान्य करून आंदोलन स्थगित केले होते.

हेही वाचा – शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार, शनिवारी; जय्यत तयारी सुरू

हा तर मुख्यमंत्र्यांचा उपमर्द

मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊन देखील कारखानदार बीले देता येत नाही असे सांगत असतील तर मुख्यमंत्र्यांचा शब्द हा उपमर्द आहे. मुख्यमंत्र्यांना मागणी करून देखील या संदर्भात शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यांनी बैठक देखील घेतलेली नाही. साखर कारखान्यांनी तातडीने दोन दिवसात शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करू, असा इशारा त्यांनी दिला.