scorecardresearch

Premium

साखर कारखान्यांनी प्रतिटन ४०० रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

राज्यातील साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपये देण्याबाबत कारखानदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

swabhimani farmers organization
साखर कारखान्यांनी प्रतिटन ४०० रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कोल्हापूर : यंदा साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळाल्यामुळे कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले आहेत. महागाईमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपये देण्याबाबत कारखानदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगांव व सोमेश्वर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा प्रतिटन ५०० रूपयापेक्षा जादा दर दिला असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. याबरोबरच महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यांतील एफआरपी देण्याचा केलेला कायदा बदलून पुन्हा एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत शिंदे, फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत शासन निर्णय तातडीने व्हावा. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान मिळावे व २ लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानबाबत शासन निर्णय करावा. साखर कारखान्यांमध्ये काटामारी रोखावी आदी मागण्या करण्यात आल्या.

youths against contracting of government jobs
सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात हजारो तरुण रस्त्यावर
nashik former bjp mp harishchandra chavan, union minister dr bharti pawar export duty on onion
कांदाप्रश्नी केंद्रीय राज्यमंत्री मूग गिळून, भाजपला माजी खासदाराकडून घरचा अहेर
sudhir-mungantiwar
“संजय गांधी निराधार योजनेचा निधी तत्काळ वितरित करा,” वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद
Raju Shetty allegation
शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रुपये न मिळण्यास राज्य शासन जबाबदार; राजू शेट्टी यांचा आरोप

हेही वाचा – कोल्हापुरातील मराठा समाजाचे आंदोलन तुर्त स्थगित; अजित पवार यांचा दौरा सुरळीत पार पाडण्याची चिन्हे

हेही वाचा – “महायुतीत सहभागी होण्यासाठी…”, अजित पवारांचा शरद पवारांवर मोठा आरोप

शेतकऱ्यांना ५० हजार महिन्याभरात

या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी लवकरच कारखानदारांना सुचना करू, असे आश्वासन दिले. ५० हजार रुपयाचे प्रलंबित अनुदान येत्या महिन्याभरात जमा होणार असल्याचे सांगितले. साखर कारखान्यांनी मॅनलेस वजनकाटे उभारावेत अशी सूचना करण्यात येईल, असे सांगितले. शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, जर्नादन पाटील, सागर शंभुशेटे तसेच मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sugar mills should pay rs 400 per ton demand of swabhimani farmers organization to deputy cm ajit pawar ssb

First published on: 11-09-2023 at 15:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×