मांडीत दुखापत झाल्यामुळे मुंबईचा कर्णधार अजित आगरकरला ६ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या इराणी करंडकाला मुकावे लागणार आहे. रणजी विजेत्या मुंबईच्या संघाला हा सामन्यापूर्वी बसलेला जबरदस्त धक्का आहे, त्याच्या अनुपस्थितीत अभिषेक नायर संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.
मांडीच्या दुखापतीमुळे अजित इराणी चषकाचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे अभिषेक नायरला संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून त्याऐवजी कोणत्याही नवीन खेळाडूला संघात स्थान देण्यात आलेले नाही, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव नितीन दलाल यांनी सांगितले.