दुबईत सुरु असलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने आपला अखेरचा साखळी सामना जिंकत केनियावर मात केली आहे. ५०-१५ अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत भारताने उपांत्य फेरीतलं आपलं स्थान निश्चीत केलं आहे. उपांत्य फेरीत भारताची गाठ कोरियाशी पडणार आहे.

आजच्या सामन्यात सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. रिशांक देवाडीगा आणि अन्य चढाईपटूंच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने मध्यांतरापर्यंत २९-५ अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर केनियाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे हे प्रयत्न तोकडेच पडले.