दीपक जोशी

१९७९पासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विश्वचषकाच्या आठ लढती झाल्या आहेत. यापैकी भारताने पाच आणि वेस्ट इंडिजने तीन लढती जिंकल्या आहेत. भारताच्या विजयांमध्ये १९८३च्या विश्वविजेतेपदाचा समावेश आहे. विंडीजने भारताविरुद्ध विश्वचषकामधील अखेरचा विजय २७ वर्षांपूर्वी १९९२मध्ये मिळवला होता. त्यानंतर १९९६, २०११, २०१५ असे तीन सलग सामने भारताने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या १२७ एकदिवसीय सामन्यांपैकी भारतीय संघ गुरुवारी हीरक महोत्सवी विजय साकारण्यासाठी उत्सुक आहे.