नवी दिल्ली : टोक्योकडे प्रस्थान करण्यापूर्वी आठवडाभर दररोज करोना चाचणी तसेच येथे दाखल झाल्यावर तीन दिवस अन्य कोणत्याही देशाच्या व्यक्तीशी संपर्कात येऊ नये, अशा प्रकारची कडक नियमावली जपान सरकारने भारतीय ऑलिम्पिकपटू आणि अधिकाऱ्यांसाठी लागू केली आहे. ही नियमावली अयोग्य आणि पक्षपाती आहे, अशी टीका भारतीय ऑलिम्पिक संघटनेने केली आहे.