भारताच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी पडल्याने हे वातावरण जवळपास इंग्लंडसारखेच भासत आहे. यावर इंग्लंडचा सलामीवीर इयान बेल याने ‘सध्याच्या थंड वातावरणाचा फायदा आमचे गोलंदाज नक्कीच उचलतील आणि आम्ही मालिकेत बरोबरी करू’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारतातील वातावरण सध्या इंग्लंडसारखेच आहे आणि याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. वातावरण थंड असल्याने गोलंदाजांची कामगिरी फार मोलाची ठरेल. यासाठी आम्ही ‘बेसिक्स’वर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे, असे बेलने सांगितले.