Bhupinder Singh revealed that MS Dhoni was appointed captain of the Indian team: महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. २००७ मध्ये कर्णधार म्हणून निवड झाल्यापासून, धोनीने भारताला २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह तीन आयसीसी विजेतेपद मिळवून दिले. २००७ मध्ये एमएस धोनीला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते, जेव्हा टीमचे वरिष्ठ खेळाडू भारतीय सेटअपमधून बाहेर होते.

एमएस धोनीला कर्णधार बनवण्याचा हा निर्णय योग्य ठरला. कारण भारतीय क्रिकेटने धोनीच्या नेतृत्त्वाखाी नवी उंची गाठली. २००७ मध्ये एमएस धोनीला कर्णधार का करण्यात आले होते, याबाबत आता एक खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा माजी भारतीय निवडकर्ता भूपिंदर सिंग यांनी केला आहे.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Shashi Tharoor's response to Harbhajan Singh tweet
त्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही: हरभजनच्या ‘सॅमसनला पुढचा टी-२० कर्णधार बनवायला हवा’ या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
Sudhanshu Trivedi BJP
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यूयॉर्क, थायलंडचे फोटो; भाजपाचा आरोप

म्हणून धोनीला कर्णधार बनवण्यात आलं होतं –

माजी भारतीय निवडकर्ता भूपिंदर सिंग यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “संघातील एक आवडता पर्याय असण्याव्यतिरिक्त, तुम्ही खेळाडूचे क्रिकेट कौशल्य, देहबोली, समोरून नेतृत्व करण्याची क्षमता आणि मॅन मॅनेजमेंट कौशल्ये पाहता. धोनीचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, देहबोली, तो इतरांशी कसा बोलतो हे पाहिले आणि त्याला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या.”

हेही वाचा – ENG vs AUS: ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत विक्रमांचा पाऊस, कर्णधार पॅट कमिन्स ‘या’ खास क्लबमध्ये झाला सहभागी

एमएस धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकेत चांगली कामगिरी केली आहे, परंतु संघाला आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. धोनीनंतर कर्णधार बनलेल्या विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले, पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले.

हेही वाचा – ENG vs AUS: पहिल्या दिवशी डाव घोषित करणे इंग्लंडच्या अंगलटी, बेन स्टोक्सने सांगितली काय होती योजना?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेतेपदापासून वंचित राहिला. त्याच वेळी, २०२२च्या टी-२९ विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला होता. यंदाचा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. तसेच भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला १० वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.