टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (१० नोव्हेंबर) उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल. या शानदार सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. उपांत्य फेरीच्या ठिकाणापासून ते त्याच्या प्लेइंग-११ पर्यंत आणि सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची शैली, त्याने काही गोष्टी सांगितल्या आहेत. सूर्यकुमार यादव चांगला फॉर्ममध्ये आहे, तो या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा आणि एकूण तिसरा फलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियातील काही मैदानांच्या आकारमानात मोठा फरक आहे. मेलबर्न हे मोठे मैदान होते, तर अॅडलेड हे छोटे मैदान आहे. आकार भिन्न असल्याने थोडे जुळवून घेण्यास थोडे अवघड आहे, म्हणून आम्ही फील्डनुसार तयारी करत आहोत. ऋषभ पंत झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना खेळला होता, तो या विश्वचषकातील त्याचा पहिला सामना होता. आज झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितले की, उपांत्य फेरीपूर्वी ऋषभ पंतला एका सामन्यातही संधी न देणे त्याच्यावर अन्यायकारक ठरले असते, त्यामुळे त्याला मागील सामन्यात संधी देण्यात आली होती. म्हणजेच ऋषभ पंतच्या नावाचीही चर्चा भारतीयांमध्ये होत असून, तो उपांत्य फेरीत खेळू शकतो. रोहित म्हणाला- दिनेश कार्तिक आणि पंत दोघेही आमच्या विचाराचा भाग आहेत.

Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Loksatta editorial Spices Board bans some Indian brand products from Singapore and Hong Kong
अग्रलेख: अनिवासींच्या मुळावर निवासी!
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!

इंग्लैंड के खिलाफ तैयारी पर

रोहित शर्माने इंग्लंड संघाविषयी सांगितले की, “ या वर्षी जुलैमध्ये आम्ही इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर टी२० मालिकेत पराभूत केले. या विजयामुळे उपांत्य फेरीतील सामन्यात अधिक आत्मविश्वास मिळेल. इंग्लंड हा धोकादायक संघ आहे. अशा परिस्थितीत आपण त्यांना यापूर्वी पराभूत केले आहे, असा विचार करून खेळता येणार नाही.

हेही वाचा :   T20 WC 2022: हर्षल पटेलचा उसळता चेंडू विराटला लागला अन्…; नेट प्रॅक्टीसचा Video ठरतोय चर्चेचा विषय

रोहित शर्मानेही पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. तो म्हणाला, “सूर्या जास्त दबाव घेत नाही. तो नेहमी अशीच फलंदाजी करतो. भारतीय संघाची धावसंख्या १० धावांत २ विकेट असो किंवा १०० धावांत २ विकेट, तो त्याचा नैसर्गिक खेळ करत फलंदाजी करतो. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघावरील दडपण कमी होते. याच कारणामुळे सूर्याचा गेल्या वर्षीही विश्वचषक संघात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून त्याने ज्या पद्धतीने अभिनव प्रयोग करत फलंदाजी केली आहे ती वाखाणण्याजोगी आहे.” रोहितने त्याच्या दुखापतीविषयी देखील सांगितले की, “ मी पूर्णपणे ठीक आहे. नेट प्रॅक्टिस दरम्यान माझ्या हातात थोडा ओरखडा आला होता, पण कोणतीही अडचण नाही. मी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे.”