India vs England t20 Updates, 10 July 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (१० जुलै) झाला. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरती झालेली ही लढत इंग्लंडने१७ धावांनी जिंकला आहे . इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून सात बाद २१५ धावा केल्या होत्या. विजयासाठी २० षटकांमध्ये २१६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. तीन सामन्यांची मालिका भारताने २-१अशी जिंकली. आजचा सामना जिंकून यजमानांनी वाचवला व्हाईट वॉश टाळला आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवची शतकी खेळी ही या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.