प्रारंभीचे दोन सामने जिंकूनदेखील चायनीज तैपेईकडून पराभव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉँगकॉँग : आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने चायनीज तैपेईला जबरदस्त टक्कर दिली. मात्र अखेरीस २-३ अशा फरकाने पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे.

भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अश्मिता चलिहा आणि पुरुष दुहेरीतील जोडी अरुण जॉर्ज व सन्याम शुक्ला यांनी त्यांचे प्रारंभीचे सामने जिंकून घेत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यात अश्मिताने पहिला सामना

२१-१८, १७-२१, २१-१९ असा जिंकला, तर पुरुष दुहेरीत अरुण आणि सन्याम यांनी त्यांचा सामना २१-१७, १७-२१, २१-१४ असा जिंकला. त्यामुळे भारत तैपेईवर मात करणार अशीच चिन्हे होती. मात्र त्यानंतरच्या तिन्ही सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंवर तैपेईचे बॅडमिंटनपटू वरचढ ठरले. वॅँग झू वेईने सौरभ वर्माला २१-७, १६-२१, २३-२१ असे नमवले, तर त्यानंतरच्या महिलांच्या दुहेरीत शिखा गौतम आणि आरती सारा तर मिश्र दुहेरीत आरती सारा आणि रुतपर्णा पांडा यांना दोनच गेममध्ये तैपेईच्या खेळाडूंनी भारताला नमवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India out from badminton asia mixed team championships
First published on: 22-03-2019 at 00:01 IST