मार्गात अनेक अडथळे असले तरी आशिया चषक स्पर्धेद्वारे भारतीय हॉकी संघ जागतिक स्पर्धेसाठी पात्र होईल, अशी आशा भारताचा माजी कर्णधार विरेन रस्किन्हा याने व्यक्त केली.
तो म्हणाला, ‘‘ड्रॅग-फ्लिकर्सच्या कामगिरीवर भारताचे यश अवलंबून आहे. आशिया चषकामध्ये बरेच बलाढय़ संघ आहेत. मात्र जागतिक हॉकी लीगमध्ये केलेल्या कामगिरीपेक्षा सरस कामगिरी भारताला करावी लागणार आहे. भारतीय संघात अनेक चांगले ड्रॅग-फ्लिकर्स आहेत. पण त्यांना जागतिक हॉकी लीगमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेद्वारे जागतिक स्पर्धेकरिता पात्र होण्याची संधी दवडल्यामुळे भारतापुढील आव्हान खडतर बनले आहे. पाकिस्तान, कोरिया, चीन, जपान आणि मलेशिया या संघांचे आव्हान भारताला पेलावे लागणार आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2013 रोजी प्रकाशित
भारतीय संघ जागतिक हॉकी स्पर्धेसाठी पात्र होईल -रस्क्विन्हा
मार्गात अनेक अडथळे असले तरी आशिया चषक स्पर्धेद्वारे भारतीय हॉकी संघ जागतिक स्पर्धेसाठी पात्र होईल, अशी आशा भारताचा माजी कर्णधार विरेन रस्किन्हा याने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘ड्रॅग-फ्लिकर्सच्या कामगिरीवर भारताचे यश अवलंबून आहे.

First published on: 01-07-2013 at 06:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian hockey team will qualify for world cup 2014 ruskin va