नवी दिल्ली : ‘आयपीएल’मध्ये पुन्हा अपयश पदरी पडले असले तरी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुच्या कर्णधारपदावर विराट कोहलीच असावा, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. कोहलीला कर्णधारपदावरून हटवावे, अशी मागणी सेहवागचा सलामीचा साथीदार गौतम गंभीरने केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘कर्णधार हा संघाप्रमाणेच उत्तम असावा. कोहलीने नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यापासून भारताची कामगिरी चांगली होत आहे. एकदिवसीय, ट्वेन्टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारांमध्ये भारत यशस्वी ठरत आहे. मात्र बेंगळूरुचा संघ अपेक्षेनुरूप कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्यापेक्षा समतोल संघ कसा बांधता येईल, याचा विचार करावा,’’ असे सेहवागने म्हटले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag backs kohli to stay on as rcb captain zws
First published on: 09-11-2020 at 03:24 IST