भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट वैर सर्वश्रुत आहे. जेव्हा-जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात, तेव्हा मैदानावरील रोमांच शिगेला असतो. जगभरातील चाहतेही या क्षणाची वाट पाहत आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. आता आपल्याला दरवर्षी या दोन संघांमधील क्रिकेट सामने पाहता येणार असल्याचे संकेत आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांना दरवर्षी चार देशांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करायची आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि भारताच्या संघांचाही समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मालिकेत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने सहभागी व्हावे, असे राजांनी सांगितले.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IND vs BAN T20I 2024 Starts On 28th April Women Team India Take Revenge of Harmanpreet Kaur
IND vs BAN Women’s T20I ‘या’ दिवशी होणार सुरु; २०२३ मधील ‘त्या’ वादाचा बदला घेणार का हरमनप्रीतची सेना?
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

रमीझ राजा यांनी ट्विटरवर लिहिले, ”नमस्कार मित्रांनो! भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या चार देशांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सुपर सीरिजचा मी प्रस्ताव देईन. ही मालिका चार देशांद्वारे रोटेशनच्या आधारावर आयोजित केली जाईल, त्याचे महसूल मॉडेल वेगळे असेल, ज्यामध्ये सर्व सहभागी देश आयसीसीसोबत नफा शेअर करतील.”

हेही वाचा – IPL 2022 : लखनऊ रेंजर्स की लखनऊ पँथर्स? गौतम गंभीरनं केला टीमच्या नावाचा खुलासा!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान पाहायला मिळाला होता. भारत आणि पाकिस्तानचे संघ नुकतेच आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर आहेत. या विश्वचषकात पाकिस्तानने भारताला हरवले. याआधी कोणत्याही विश्वचषकात पाकिस्तानला भारताला हरवता आले नव्हते.