बांगलादेशविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विंडीजविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत ICC ने मोठा बदल करण्याचं ठरवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा –  विंडीजच्या भारत दौऱ्यात महत्वपूर्ण बदल, जाणून घ्या…

नुकत्यात पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात मैदानावरील पंचांनी तब्बल २१ नो-बॉलचे निर्णय दिलेच नाहीत. ज्यामुळे पंचांच्या क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यामुळे आगामी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिकेत, तिसरे पंच नो-बॉलचा निर्णय देणार आहेत. ICC मधील सुत्रांनी हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राला माहिती दिली.

अवश्य वाचा – विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन

याआधी २०१९ आयपीएल हंगामात अशाच प्रकारे पंच एस.रवी यांनी नो-बॉलचा निर्णय दिलाच नव्हता. ज्यानंतर आयसीसीने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. प्रदीर्घ काळ झालेल्या चर्चेनंतर आयसीसीने नवीन नियम आखताना तिसऱ्या पंचांकडे नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी सोपवली होती. या नवीन निर्णयाची अंमलबजावणी आता भारत विरुद्ध विंडीज मालिकेत होणार असल्याचं समजतंय.

More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv umpire no ball trials from india west indies series psd
First published on: 25-11-2019 at 16:20 IST