फळांच्या गरात फायबरचे प्रमाण चांगले असते. तसेच ‘ए’, ‘बी’, ‘सी’ ‘ई’ आणि ‘के’ ही जीवनसत्वे आणि खनिजेही फळांमधून मिळतात. पण या गराबरोबर सालीचे असलेले महत्व अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. झाडावर लगडलेल्या फळांच्या सालीत सूर्यकिरणांमुळे वेगवेगळी पिगमेंटस् तयार होत असतात. या नैसर्गिक पिगमेंटस्मुळे फळांना त्यांचे विशिष्ट रंगही प्राप्त होतात. ‘कॅरोटिनॉइड’ आणि ‘फ्लॅवेनॉइड’ या नावांची ही पिगमेंटस् फळांचे संरक्षण करतात. ते फळ खाल्ल्यावर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कामही ही पिगमेंटस् करत असतात. फळ खाल्ल्यावर त्यातली कॅरोटिनाईडस् शरीरात जाऊन ‘ए’ जीवनसत्वात परिवर्तित होतात. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ए जीवनसत्व मदत करते. फ्लॅव्हेनॉईडस्ही रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्यामुळे दमा किंवा हृदयविकारासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ती फायदेशीरच ठरतात. फळांच्या सालीत फायबर म्हणजे तंतूमय पदार्थही पुष्कळ असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’कमी वेळात आपण २-३ ग्लास फळांचा रस सहज पिऊ शकतो, शिवाय रस काढण्यासाठी अधिक फळे लागतात. पण सालासकट फळ खाताना ते खूपदा चावून खावे लागत असल्याने चर्वणतृप्ती होते आणि एका वेळेस खूप फळे खाता येत नाहीत. फळांचा रस शरीरातील साखरेची पातळी आणि कॅलरी लेव्हलही वाढवतो, उलट फळ खाल्ल्यावर शरीरात तुलनेने कमी कॅलरीज जातात. उदा. सफरचंदाच्या एक ग्लास रसातून ११५ कॅलरीज आणि ०.५ ग्रॅम फायबर मिळते. तर १ सफरचंद खाल्ल्यावर फक्त ५४ कॅलरीज मिळतात, तर २.४ ग्रॅम फायबर मिळते. त्यामुळे जेव्हा फळ खाणे शक्य नसेल तेव्हा घरी काढलेला, न गा़ळलेला फळांचा रस चालू शकेल. वृद्धांसाठी आणि लहान मुलांसाठी याचा फायदा होतो. पण शक्य असल्यास आख्खे फळ खाण्यास प्राधान्य दिलेले चांगले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat whole fruits nck
First published on: 18-09-2020 at 13:24 IST