भारतीय हे कसे मुळातच अस्वच्छ आहेत आणि आम्ही कसे स्वच्छतेचे भोक्ते आहोत, हे सांगण्यामध्ये पाश्चात्त्यांना कोण धन्यता वाटते नाही! वास्तवात आपल्या पुर्वजांनी आरोग्याला आणि आरोग्यासंबधित शौचविधीला अर्थात स्वच्छतेला इतके नितांत महत्त्व दिले आहे की त्याचे मार्गदर्शन केवळ आयुर्वेद नव्हे तर धर्मग्रंथांमध्येसुद्धा विस्ताराने केलेले आढळते. आज २१व्या शतकात मात्र पाश्चात्यांचे अनुकरण करता-करता आपण आपल्याला शिकवलेले स्वच्छतेचे आणि आरोग्याचे मूलभूत नियम पायदळी तुडवत आहोत, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आधुनिक उपहारगृहांमध्ये केला जाणारा ‘फिंगर-बाऊल’चा उपयोग!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरोप-अमेरिकेमधील थोरामोठ्यांकडे जेवण झाल्यानंतर एका बाऊलमध्ये लिंबू व कोमट पाणी दिले जाते. खरं तर लहानशा-सुबक बाऊलमध्ये कोमट पाणी व सोबत कापलेले लिंबू दिले तर, ‘ते लिंबू कोमट पाण्यामध्ये पिळून प्यायचे, जेणेकरुन अन्न व्यवस्थित पचेल,’ असे एखाद्याला वाटले तर त्यात आश्चर्य नाही. पण प्रत्यक्षात मात्र ते लिंबू त्या कोमट पाण्यामध्ये पिळून त्या पाण्यामध्ये हात स्वच्छ करायचे, अशी अपेक्षा असते. आता त्या वीतभर लांबीच्या बाऊलमध्ये आपले दोन्ही हात बुचकळवून-बुचकळवून कसे काय धुवायचे, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कोणी म्हणेल ‘अहो, पाश्चात्य जेवताना काटा-चमचा वापरतात, त्यांच्या हातांचा अन्नाशी संपर्कच येत नाही. त्यामुळे फिंगर-बाऊलमधील थोड्याशा पाण्यात नुसते हात बुडवले तरी चालते.’ खरंतर त्यांच्याकडेही असे खाद्यपदार्थ आहेत, जे हातांनीच खावे लागतात .तरीही पाश्चात्य व काही इंग्रजाळलेल्या शहाण्या भारतीयांना सर्वच पदार्थ काट्या-चमच्यांनी खाण्याची करामत जमते, असे घटकाभर धरून चालू, पण अस्सल भारतीय पदार्थांचे काय? कित्येक भारतीय पदार्थ काट्या-चमच्याने खाणे शक्यच नाही. भारतीय अन्नपदार्थ खाताना अन्न हातांना लागतेच लागते. तरीही आपण का बरं फिंगर बाऊल वापरावा?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi dont wash your hands in finger bowl know the reason
First published on: 20-02-2017 at 09:00 IST