Husband Wife Relation : नवरा-बायकोचं नातं हे जगावेगळं असतं. लग्नानंतर या नात्याची नवी सुरुवात होते. या नवीन प्रवासात ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. लग्नानंतर सुरुवातीला एकमेकांना जाणून घेण्याच्या प्रयत्नात संसार गोड वाटतो; पण कालांतराने नात्यातील हा गोडवा आणि प्रेम कमी होण्याची शक्यता असते. तसे होऊ नये यासाठी काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यासाठी फक्त तीन गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका; मग तुमच्या नात्यातील गोडवा अन् प्रेम कायम राहील.

एकमेकांचा करा आदर

प्रत्येकाला आपला स्वाभिमान अधिक प्रिय असतो. त्यामुळे जोडीदाराच्या स्वाभिमानाचा आदर करणंही गरजेचं आहे. कोणतंही नातं फक्त प्रेमावर टिकत नाही; तर त्याबरोबर काळजी, समजूतदारपणा व एकमेकांविषयी आदर असावा लागतो. तेव्हा जोडीदाराचा आणि त्याच्या भावनांचा आदर करा.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

हेही वाचा : पालकांनो, या गोष्टी लक्षात ठेवा; मग मुले तुमच्याशी कधीही बोलणार नाहीत खोटे

एकमेकांवर ठेवा विश्वास

कोणत्याही नात्याचा भक्कमपणा विश्वासावर अवलंबून असतो. जर विश्वास गमावला, तर तो पुन्हा कमवायला वेळ लागतो. त्यामुळे एकमेकांशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे आणि एकमेकांवर विश्वास ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विश्वासामुळे नाते आणखी घट्ट होते.

रागात असताना शब्दांना घाला आवर

अनेक जण रागात असताना काहीही बोलतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. नवरा-बायकोच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम टिकवायचे असेल, तर शब्द जपून वापरा. रागात असताना शब्दांना आवर घाला. कधी कधी एखाद्या चुकीच्या शब्दामुळे नातं बिघडू शकतं.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)