कार्तिक शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी छठ उत्सव साजरा केला जातो. याला सूर्य षष्ठी असेही म्हणतात. हा सण प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात साजरा केला जातो. छठ पूजेमध्ये सूर्यदेव आणि छठी मैया यांची पूजा केली जाते.मान्यतेनुसार, छठमैया मुलांचे रक्षण करते. हा सण 4 दिवस साजरा केला जातो. जी कार्तिक शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होते आणि कार्तिक शुक्ल सप्तमीला संपते. छठ व्रत पाळणाऱ्यांनी छठ व्रताची कथा नक्कीच वाचावी. चला तर मग जाणून घेऊयात छठ व्रताची कथा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छठ कथा

पौराणिक मान्यतेनुसार प्रियव्रत नावाचा एक राजा होता ज्याच्या पत्नीचे नाव मालिनी होते. त्यांना मूलबाळ नव्हते. यामुळे दोघेही दु:खी झाले होते. महर्षी कश्यप यांच्याकडून संततीप्राप्तीच्या इच्छेने त्यांनी पुत्रेष्टी यज्ञ केला. यज्ञ पूर्ण झाल्यावर महर्षींनी राजा प्रियव्रताची पत्नी मालिनी हिला खीर दिली. खीर खाल्ल्याने मालिनी गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला. पण त्याला मृत पुत्र मिळाला. राजाला खूप वाईट वाटले. निराश होऊन त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katha by reading this story of chhath festival wishes are fulfilled such is the belief scsm
First published on: 10-11-2021 at 13:24 IST