मागील काही वर्षांपासुन “भरपूर पाणी प्या” असा एक ढोबळ सल्ला आधुनिक आहारतज्ज्ञ देतात आणि लोकसुद्धा साधकबाधक विचार न करता त्याचे पालन करतात. पोषणाबाबतचा एखादा सल्ला असला म्हणजे तो सरधोपटपणे एकजात सर्वांना लागू करायचा, ही रीतच अयोग्य आहे. तहान ही एक नैसर्गिक संवदेना असल्यामुळे शरीराला पाण्याची गरज असेल तर माणसाला तहान लागणारच आणि त्यानुसार पाणी प्यायलेही जाणार. दिवसभरातून शरीराला साधारण दीड लीटर पाण्याची गरज असते, तेवढे पाणी आपण पितो व प्यायले पाहिजे. मात्र ’हायड्रेट युवर बॉडी’असे म्हणून, जेव्हा जाता येता पाणी पिण्याचा जो खुळचट सल्ला दिला जातो, तो योग्य नाही. या अति जलपानाचा शरीराच्या विविध जैवरासायनिक क्रियांवर विपरित परिणाम संभवतो काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचे उत्तर १९२० साली क्षेमशर्मा नावाच्या लेखकाने लिहिलेल्या ‘क्षेमकुतूहल’ या ग्रंथामध्ये निश्चित शब्दांमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामध्ये असे स्पष्टपणे म्हटले आहे की, “अत्यम्बुपानान्न् विपच्यतेऽन्नं” अर्थात् अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overhydration drinking too much water can be harmful for health
First published on: 22-03-2019 at 13:07 IST