निसर्गाच्या ऋतुचक्राप्रमाणे आपल्या भोवतीचे वातावरणही सतत बदलत असते. आपल्या देशात वर्षभरात एकूण सहा ऋतू अनुभवायला मिळतात. खंडप्राय देश असल्यामुळे एकाच वेळी सर्वत्र सारखे ऋतुमान नसते. किंबहुना ज्यावेळी काश्मीरमध्ये बर्फ पडत असतो, तेव्हा दक्षिणेत २५ अंश सेल्सिअस तापमान असते. मात्र साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हिवाळा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकंदरीत ऋतुमान, आरोग्य आणि त्यासंबंधित भुकेचा विचार केला तर थंडीच्या मोसमात भूक जास्त लागते. बाहेरील थंडीचा परिणाम शरीराच्या अंतर्गत अवयवांवर होऊ नये, म्हणून त्वचेची सूक्ष्म छिद्रे आकुंचन पावतात. यामुळे शरीरातील उष्णता आत कोंडली जाते व ही उष्णता अधिक भूक लागण्याचे कारण ठरते. या थंड वातावरणात एरवी पचायला जड असलेले पदार्थ सेवन केले तरी ते पचायला सोपे जाते. कमी आहार घेणारी माणसे या दिवसांत अधिक जेवतात आणि ते अन्न चांगल्या रीतीने पचवितात. मात्र या वातावरणात काय खाऊ नये आणि काय खावे किंवा कुठले अन्नपदार्थ थंडीच्या दिवसात पोषक असतात याची माहिती असणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthiest winter foods
First published on: 10-12-2016 at 04:43 IST