विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
सांगलीमध्ये पूरग्रस्तांची सुटका करणारे पथक नागरिकांना सुरक्षा बोटींमध्ये घेऊन तीन दिवस सलग कार्यरत होते. त्या अवस्थेत तिसऱ्या दिवशी कुणा एका सैनिकाची नजर जीव वाचविण्यासाठी सलग तीन दिवस एका खांबावरच अडकून राहिलेल्या माकडाच्या पिल्लाकडे गेली. त्याने सुरक्षा बोट त्याच्या दिशेने नेली आणि माकडाच्या त्या पिल्लाच्या दिशेने मदतीचा हात पुढे केला. त्या माकडाने त्याचा हात पकडून थेट त्याला मिठीच मारली. सुरक्षित स्थळी आल्यानंतर त्या माकडाला उतरवण्याचा प्रयत्न त्या सैनिकाने केला. मात्र ते एवढे भेदरलेले होते; त्याला बसलेला मानसिक धक्का एवढा मोठा होता की, ते माकड त्या सैनिकाला नंतर काही तास घट्ट बिलगूनच होते. माकडाची ही अवस्था तर उत्क्रांत झालेल्या माणसाच्या मनावर या महापुराचे किती आघात झालेले असतील, याची केवळ कल्पना केली तरी या महापुराचे महागंभीर परिणाम सहज लक्षात येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापुरानंतर मदतीचा ओघ सुरू झाला तो नंतरही काही काळ कायम राहील. सरकारने नुकसानभरपाईही जाहीर केली, ती मिळेलही. पण ती कितीशी पुरणार आणि त्यातून पूरग्रस्तांची आयुष्ये उभी राहणार का हा प्रश्नच आहे. आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे केवळ नागरिकांची सुटका असेच समीकरण दिसते आहे. आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात तिच्या आगमनाच्या मिळालेल्या इशाऱ्यानंतर तात्काळ होते. मनुष्यहानी व वित्तहानी वाचविण्यासाठी प्रयत्न तात्काळ अपेक्षित असतात. मात्र आपल्याकडे दिसली ती केवळ आपत्तीनंतरची पळापळ. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या घाटमाथ्यावरच्या जोरदार पावसाच्या इशाऱ्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे झालेले दुर्लक्ष हे महापुराचे महाकारण आहे. या खेपेस कव्हरस्टोरीमध्ये त्याकडेच ‘लोकप्रभा’ने लक्ष वेधले आहे.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra flood 2019 heavy rain
First published on: 23-08-2019 at 01:06 IST