स्वातंत्र्य म्हटल्यावर पहिला विचार येतो तो म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नसावे, तर ते सर्वसमावेशक असावे. ते सांस्कृतिक स्वातंत्र्यदेखील असायला हवे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य आणि त्याचा वापर हा प्रश्न उभा राहतो. ‘बळी तो कान पिळी’ अशी स्थिती होऊ  नये; पण दुर्दैवाने आज तशी परिस्थिती आहे. जो बळी आहे त्याला सारं काही विकत घेता येऊ  शकतं आणि दुर्दैवाने सारं काही विकाऊ  झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावं, पण त्याच्या नावाखाली स्वैराचार नसावा, विकृतीकरण नसावं. जे काही सांगायचंय ते समंजसपणे व्यवस्थित मांडता आले पाहिजे. स्वत: अनुभवलेलं, पाहिलेलं मांडायची ताकद त्यामध्ये हवी. पंतप्रधानांच्या चेहऱ्याचा मेमे करणे ही अभिव्यक्ती नाही होऊ  शकत.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor makrand anaspure special article on independence day
First published on: 11-08-2017 at 21:57 IST