दर बारा कोसांवर भाषा बदलते, तशीच प्रांतागणिक खाद्यसंस्कृतीदेखील बदलते. अगदी एकाच प्रांतातदेखील वेगवेगळी असते. खंडप्राय अशा आपल्या देशातील खाद्यसंस्कृतीच्या वैविध्याची एक झलक…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न ही मानवाची मूलभूत गरज. पण केवळ गरजेपुरतेचं म्हणजे शरीराला आवश्यक म्हणूनच अन्न सेवन करायचं असते तर आजही आपण अदिम काळाप्रमाणेच कंदमुळे खाऊन पोट भरले असते. पण मानवाने त्यात असंख्य प्रयोग केले आणि आजही करत आहे. सतत विकसित होणारा असा हा घटक. स्थलवैविध्याप्रमाणेच या प्रयोगांमध्येदेखील वैविध्य येत गेले. त्या त्या प्रदेशात उपलब्ध असणारी सामग्री, तेथील राहणीमान, हवामान आणि धार्मिक पगडा अशा सर्वच घटकांचा परिणाम त्यावर होत गेला. प्रदेशाबरोबरच त्या त्या समूहाचा प्रभावदेखील महत्त्वाचा होता. तोच पुढे जातीधर्माशी निगडित विशिष्ट अशा खाद्यरचनेतदेखील दिसून येतो. या सर्वातूनच प्रत्येकाची अशी स्वत:ची स्वतंत्र अशी पद्धती/संस्कृती तयार होत गेली. मग कधी ती एकदम तिखट जाळ अशी झाली, तर कधी एकदम चिंच-गुळाच्या वापराने आंबटगोड. कालौघात त्यात बदल होत गेले. कधी मूळ साच्याला धक्का लागला, तर कुठे आजही तो भक्कम आहे. मात्र मानवाने हे प्रयोग करणे थांबवले नाही.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food culture in india
First published on: 19-05-2017 at 01:04 IST