सरकार ग्रामीण भागासाठी रोजगार हमी योजना चालवतं. ती सरकारी पद्धतीनेच चालते. त्यावर मार्ग काढत काही संवेदनशील नागरिकांनी यावेळच्या भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागासाठी  नियोजनपूर्वक ‘प्रायव्हेट’ रोजगार हमी योजना चालवली. त्याबद्दल-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा लेख लिहायला घेत असताना बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत. महाराष्ट्रातले २६ जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळत आहेत. २६ हजार ३०० गावांमध्ये नुकताच दुष्काळ जाहीर झाला आहे. लातूरला मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्याच्या श्रेयासाठी झालेली चढाओढ महाराष्ट्राने पाहिलेली आहे. मंत्र्यांचे दुष्काळदौरे नेहमीप्रमाणेच फार्स ठरलेले आहेत. कन्हैयाकुमारने नरेंद्र मोदींना मराठवाडय़ात दौरा करण्याचे आवाहन केलेले आहे आणि असे करताना आपण स्वत: मराठवाडय़ात जाऊन यावे असे त्याला वाटलेले नाही. आयपीएल महाराष्ट्रात असावी की नसावी यावरून चॅनेलवरच्या पॅनेलवर घमासान चर्चा झालेल्या आहेत. सत्ताधारी-विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जाणत्या राजांनी दुष्काळासाठी ऊस या पिकाला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचा निर्वाळा देऊन पुढील राजकारण-अर्थकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याचे दिग्दर्शन केलेले आहे. या कोणत्याच गोष्टीचा दुष्काळात जगणाऱ्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी फारसा उपयोग झालेला नाही.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private rojgar hami yojana
First published on: 27-05-2016 at 01:20 IST