प्रत्येक पिढीने आधीच्या पिढीची असुरक्षितता, भय, न्यूनगंड पुढे आपल्या अंगावर घेऊन वागवत बसण्याची सक्ती कोणत्याही सुसंस्कृत समाजात नसते. त्याचप्रमाणे आपली आदर्श मूल्येसुद्धा पुढील पिढीवर कोणत्याही पिढीने लादता कामा नयेत. काळ फार वेगाने बदलत असतो आणि मूल्यव्यवस्था ही कालसापेक्ष असते. आपल्याला ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि सर्वात अग्रक्रमी असाव्यात असे वाटते, त्या अतिशय साहजिकपणे पुढील पिढीला बिनमहत्त्वाच्या आणि संपूर्ण कंटाळवाण्या वाटणे, हे नुसते साहजिकच नाही, तर चांगलेच आहे. भारतीय स्त्रीवाद ही यापैकी अशी एक गोष्ट आहे- जी पुन्हा शिवायला  झाली आहे, कारण जुनी आता होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी निर्णय न घेणाऱ्या आणि दुसऱ्याच्या कष्टांवर किंवा नुसतेच नवऱ्याच्या कमाईवर आयुष्य काढणाऱ्या बायका घरीही पाहिल्या नाहीत आणि आजूबाजूच्या समाजातही नाही. मी ज्या वातावरणात आणि आर्थिक व सामाजिक संस्कृतीत वाढलो त्यात बायका पैसे कमवायला घराबाहेर पडत होत्या. असे करताना त्या आत्मसन्मानाची किंवा समतेची पावडर तोंडाला लावून कोणत्याही चळवळीची जाहिरात करीत नव्हत्या. त्यांना पुस्तकी आणि प्राध्यापकी विचारांच्या बडबडी ऐकायला किंवा सभांना जायला वेळ नव्हता. याचे सोपे कारण- त्यांना घर चालवायचे होते आणि कुटुंब पोसायचे होते. पूर्णवेळ गृहिणी म्हणून घरी बसून स्वत:च्या सुखाची किंवा दु:खाची अंडी उबवत बसणाऱ्या बायका प्राणिसंग्रहालयात पाहायला जावे तशा दुर्मीळ असत. किंवा त्या खूप श्रीमंत अशा व्यापारीवर्गात असत; जिथे दागिने मिरवून घराण्याची श्रीमंती दाखवणे आणि वारस पैदा करून व्यापारउदीमाला घरचे मनुष्यबळ पुरवणे अशी कामे त्या करीत. माझ्या आजूबाजूला जगणाऱ्या बायका नोकऱ्या आणि विविध व्यवसाय करून पैसे कमावत होत्या. त्यांना तसे केल्याशिवाय पर्याय नसे. आणि हे सगळे मी स्त्रीवादी पंडित असलेल्या माणसांना भेटण्याआधीच माझ्या आयुष्यात चालू होते.

मराठीतील सर्व करंट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author sachin kundalkar article on housewife part
First published on: 10-12-2017 at 02:27 IST