नव्या सहस्रकाच्या उदयाबरोबरच समोर आलेल्या निवडक समर्थ कवींमधील एक नाव म्हणजे- अशोक कोतवाल! ‘मौनातली पडझड’, ‘कुणीच कसे बोलत नाही’ आणि आता ‘नुसताच गलबला’ या कविता संग्रहांमधून कालभान देणारा हा कवी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिकीकरण, संगणकीकरण, मार्केटिकरण यांच्या एका गरगर फिरणाऱ्या भोवऱ्यात सध्या जग वेगाने फिरत आहे. या भोवऱ्यात माणूसपण मूल्य, संस्कृती, भाषा हे सगळं नाहीसे होत एकच एक बाजारमूल्य सर्वावर लादलं जातंय. माणसांच्या जीवनातली विविधरंगी विशिष्टता नष्ट होऊन सपाटीकरण सुरू आहे. या भोवऱ्यातच ‘स्टाइलचं आणखी एक इंद्रिय उगवलेली मुलं’ जन्माला आली आहेत, जी विचारतायत- ‘तुमच्या देशात अजूनही उगवतो का हो आस्थेचा चंद्र?’ आजच्या वर्तमानातलं, जीवनाच्या सर्वच पैलूंमधून अंगावर येणारं विदारक वास्तव अशोक कोतवाल यांच्या कवितेतून प्रकट झालंय.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review nustach galbala by ashok kotwal
First published on: 27-05-2018 at 01:02 IST