अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- काशीनाथ विष्णू फडके!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिपळूणकरांच्या निबंधमालेची सुरुवात झाली, त्याच्या आसपासचा काळ हा मराठी समाजात आत्मपरीक्षणाचा काळ होता. त्याचे पडसाद तत्कालीन लेखनात पडलेले दिसतात. इथला शिक्षित झालेला तरुणवर्ग बालविवाह, स्त्रीशिक्षण, इंग्रजीचे फायदे-तोटे, धर्मसुधारणा आदी विषयांवर गंभीरपणे व्यक्त होत होता. त्याच वेळेस ठाण्यातील एक तरुण मात्र याच विषयांवर उपहास, उपरोध, कारुण्य, विसंगती व अतिशयोक्तीने युक्त लिखाण करीत होता. तो तरुण म्हणजे काशीनाथ विष्णू फडके आणि त्यांचे हे लिखाण होत होते ते त्यांच्या ‘हिंदुपंच’ या साप्ताहिकातून. २१ मार्च १८७२ रोजी हिंदूुपंचचा पहिला अंक निघाला. फडके हे त्याचे संपादक होते. त्यात ‘पंचआजोबा’ या टोपणानावाने ते लिहीत.

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashinath vishnu phadke role in marathi language development
First published on: 21-05-2017 at 03:52 IST