अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- विष्णु परशुरामशास्त्री पंडित!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८५५ मध्ये बंगालच्या पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवाविवाहाची मागणी करणारा अर्ज सरकारकडे सादर केला. १८५६ मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाहाचा अधिनियम मंजूर झाला. त्यानंतर बंगाल आणि महाराष्ट्रातही विधवा पुनर्विवाहाला चालना देणारी चळवळच उभी राहिली. या काळात मराठी समाजातील संवेदनशील मनांना स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह या विषयांचे गांभीर्य आणि निकड जाणवू लागली होती, आणि त्यातील काही आपापल्यापरीने याबाबत कर्तेपणही सिद्ध करत होते. अशा कर्त्यांमध्ये विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. ते मूळचे सातारचे. सुरुवातीच्या काळात त्यांनी व्याकरण व न्यायशास्त्राचे अध्ययन केले. पुढे पुण्याच्या सरकारी पाठशाळेत इंग्रजी शिक्षणही घेतले. काही काळ शाळाखात्यात नोकरी करून ते १८६४ साली सेवानिवृत्त झाले. त्याच वर्षी ‘एक स्वदेशहितेच्छु’ या नावाने ‘ब्राह्मणकन्याविवाहविचार’ हे पुस्तक विष्णुशास्त्रींनी लिहिले. त्यात त्यांनी प्रौढविवाहाविषयी मते मांडली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात,

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnu parashuram shastri pandit marathi literature marathi development
First published on: 26-03-2017 at 01:39 IST