आता लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असतो. पण आंतरपाटच नेमका कुठेतरी गहाळ झालेला असतो. अनेकांच्या माता-पित्यांची नम्र आठवण (मनातल्या मनात) काढून तो शोधला जातो. नवरा-बायकोच्या गळ्यात घालायचे हार सकाळीच आणल्यामुळे आपसात गुंतलेले असतात. पालकांचा जीव घाईला आलेला असतो. आणि मांडवात मात्र..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागच्या आठवडय़ात केटरर घरी येऊन काही काळ कलह माजवून गेला ते आपण वाचलंच असेल असं मी गृहीत धरतो. आता मूळ लग्नाच्या प्रसंगाला फार थोडे दिवस उरलेले असतात. तरी वधू-वराच्या घरी वाद चालूच असतात. त्यातला मुख्य वाद म्हणजे बोलावणी. कारण दोन्ही बाजूला काही अवघड नातेवाईक असतात. एकीकडे- ‘‘बापूकाका नको? अगं, केवढे उपकार आहेत त्यांचे आपल्या घरावर! माझं सगळं शिक्षण त्यांनी केलंय.’’

मराठीतील सर्व मी जिप्सी.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author sanjay mone article on wedding experience
First published on: 25-02-2018 at 01:01 IST