याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या दख्खनी उर्दू रचनांचा परिचय करून घेतला. खरे तर ती तोंडओळखच म्हणावयास हवी. रामदासांनी आताच्या उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी उत्तर प्रांतांत केलेली भ्रमंती या उर्दू रचनांमागील प्रेरणा होती. या भ्रमंतीतून त्यांना उत्तर भारतीयांनाही जोडून घेण्याची गरज वाटली. त्यातून या रचना निर्माण झाल्या. लेखिका मनीषा बाठे यांनी विविध ठिकाणची जुनी दफ्तरे धुंडाळून या उर्दू रचनांचे संकलन केले आणि त्यांनी ते स्वत:च छापले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रचनांचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला आहे अमराठी युवकांसाठी समाजपरिवर्तनाची स्फूर्तिकाव्ये. यात प्रामुख्याने दखनी पदावल्या आढळतात. दुसरा भाग मुसलमानी अष्टके आणि स्फुटे. गणेश शारदा ते आलख निरंजन अशा अनेकांचा आधार घेत समर्थानी यात आपली मते व्यक्त केलेली आहेत. तिसरा प्रकार आहे तो मराठीबा हिंदू समाजासाठी ईशस्तवने. नावात सूचित केल्याप्रमाणे यात सरळ-साधी ईशस्तवने आहेत.

मराठीतील सर्व रामदास विनवी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reason of samarth ramdas study
First published on: 11-09-2016 at 02:38 IST