आनंदवन सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत भारतीयांपेक्षा विदेशी मंडळीच आनंदवनात जास्त संख्येने आली. आपल्या देशातली काही मोजकीच माणसं आनंदवनात येत असत, ज्यात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, प्रभाकरपंत कोरगावकर, गो. नी. दांडेकर, यदुनाथ थत्ते यांचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंदवनातील कुष्ठमुक्त संघर्ष करून समाजात आपलं अस्तित्व निर्माण करतील; सोबतच निर्मितीत गुंतलेले हे हात आपल्या परिश्रमांतून स्वत:च्या गतीने चालणारी एक समाधानी आणि स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणारी व्यवस्थाही निर्माण करतील, अशी बाबा आमटेंची पक्की धारणा होती. यासाठी आनंदवनातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन चैतन्यपूर्ण असणं, बाजगताशी कल्पनांची देवाणघेवाण होणं गरजेचं होतं. त्यामुळे बाहेरच्या उदासीन जगाला आनंदवनाजवळ आणण्याचा एक प्रयत्न म्हणून बाबांनी एका वार्षिक ‘मित्रमेळाव्या’चं आयोजन करण्याचा घाट घातला. ते साल होतं १९६१. पहिल्या मेळाव्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, मनोहरजी दिवाण, दादा धर्माधिकारी, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, रावसाहेब पटवर्धन, डॉ. रामचंद्र वारदेकर, अण्णासाहेब कोरगावकर, नाना वेले, कमलाताई होस्पेट, गो. नी. दांडेकर, शंकरराव देव, आचार्य भागवत, आचार्य जावडेकर अशी मोठमोठी मंडळी आली होती. सत्य आणि कल्पिताच्या मिश्रणातून आनंदवनाचं प्रत्ययकारी चित्र साकारणाऱ्या ‘आनन्दवनभुवन’ या गोनीदांनी लिहिलेल्या कादंबरीचं प्रकाशन रावसाहेब पटवर्धन यांच्या हस्ते झालं. आनंदवनात निवासासाठी पक्की बांधकामं फारशी नव्हती, म्हणून तट्टय़ाच्या मंडपांत पाहुण्यांची निवासव्यवस्था होती. पहिल्या मित्रमेळाव्याची पूर्वतयारी म्हणून इंदूने गीताबाई नेमाडे, सुशीलाबाई केळकर व कौसल्याबाई या कार्यकर्त्यां महिलांच्या मदतीने महिनाभर आधीपासून फावल्या वेळात दीड-दोन हजार लोकांना लागेल एवढं धान्य निवडणं, पाखडणं करून ठेवलं होतं.

मराठीतील सर्व संचिताचे कवडसे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous indian personality visited in anandwan village
First published on: 02-07-2017 at 01:57 IST