मराठी भावगीतांच्या नव्वद वर्षांच्या प्रवासातील गाजलेली गाणी, त्यांचे कर्तेधर्ते, त्या गाण्यांची वैशिष्टय़े, त्यावरील पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव, आकाशवाणीचा त्यांच्या प्रसारातील मोलाचा वाटा अशा दिलचस्प गोष्टींबद्दलचे रसीले सदर.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काव्यगायक गजानन वाटवेंचा कार्यक्रम म्हणजे अमर्याद गर्दी हे ठरूनच गेलं होतं. गायनासाठी कवितेची चोखंदळ निवड हा उत्तम गुण त्यांच्यापाशी होता. कविता निवडल्याक्षणी त्यांना चाल सुचत असे. ती चाल रसिक कान देऊन ऐकत तेव्हा त्यांना त्या काव्याचा अर्थ आपसूक उमजे. त्यांच्या गायनातून त्यातला आशय आणि अर्थ अलवारपणे उलगडे. ती आपल्याही मनातली भावना आहे असं त्यांना वाटे. कवितांचे वेगवेगळे विषय त्या गायनातून आकळायचे. मुळात भावगीतांचं बलस्थान म्हणजे गीत ऐकल्यावर श्रोत्याच्या मनात उभं राहणारं चित्र. एकाच भावगीताने गर्दीतल्या मनामनांत अशी शेकडो चित्रं तयार होत. पुन्हा त्या गीताशी निगडित प्रत्येकाच्या आठवणी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अमुक एक गीत मला का आवडते, याचे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. भावगीतात चित्रपटातील वा नाटय़पदातील नायक नजरेसमोर नसतो. ऐकणारा प्रत्येक जण त्यातला नायक असतो. गजाननराव वाटवेंच्या गायनातून हे अनुभवास येई. त्यांचे गायन थेट श्रोत्यांच्या हृदयात पोहोचत असे. मुंबईत वाटवेंचं गायन असलं की प्रचंड गर्दीमुळे ट्रॅम बंद पडत असत.

मराठीतील सर्व स्वरभावयात्रा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ninety years of renowned marathi bhavgeet songs journeys
First published on: 22-01-2017 at 01:13 IST