माणसाला चांगले वागण्यासाठी प्रत्येक वेळी धर्म सा करतोच असे नाही. माणसे धार्मिक असतात आणि वाईटही असतात. तुकाराम हे सारे अनुभवत होते. त्यांना जलदिव्य करावयास भाग पाडणारे रामेश्वरभट्ट किंवा त्यांना छळणारा मंबाजी हे धार्मिक नव्हते असे कोण म्हणेल? तेही देवपूजा करणारे होते, सर्व धार्मिक कर्मकांडे मनापासून करणारे होते, जप-तप, यज्ञ-याग करणारे होते. पण त्यांची ही धार्मिकता म्हणजे ‘अंतरीं पापाच्या कोडी। वरी वरी बोडी डोई दाढी।।’ या प्रकारची. बा उपचारांत रमणारी. अशी माणसे, असे स्वत:ला संत समजणारे पायलीला पन्नास मिळतील. पण त्यांना माणूस म्हणण्यास तुकोबा तयार नाहीत. सदाचार आणि नीती या त्यांच्या चांगुलपणाच्या कसोटय़ा होत्या. तोच त्यांच्या दृष्टीने ‘धर्मनीतीचा वेव्हार’ होता. ‘धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हांसी’ असे तुकाराम ज्या धर्माबद्दल बोलत होते, तो धर्म रूढी, कर्मकांडाधिष्ठित, वरवरच्या उपाध्यांत रमणाऱ्या धर्माहून वेगळा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुकोबा मांडत होते ते तत्त्वज्ञान अद्वैताचे. ‘क्षर अक्षर हें तुमचे विभाग। कासयानें जग दुरी धरा।।’ – क्षर म्हणजे जग वा जीव आणि अक्षर म्हणजे माया हे तुमचेच दोन विभाग असताना तुम्ही जगाला आपल्यापासून दूर का ठेवता, असा सवाल तुकोबा परमेश्वरालाच विचारत होते. ‘उदका वेगळा। नव्हे तरंग निराळा।।’ पाणी आणि त्यावरील तरंग भिन्न नसतो. तसाच परमेश्वर या जगामध्ये. ‘जीव हा ब्रह्मरूपच’ ही यातील भूमिका. वैदिक धर्माचा गाभा तोच आहे. पण हा धर्म पाळणारे आचरण करीत होते ते नेमके याच्या उलट. यासंदर्भातील तुकोबांचा एक अभंग भला मार्मिक आहे-

मराठीतील सर्व तुका लोकी निराळा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant tukaram view on religion
First published on: 18-09-2016 at 04:21 IST