बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवल्याने राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल एकत्र येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी संयुक्त जनता दलाशी युतीचे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी दिले आहेत.लोकसभा निवडणुकीत आमच्या दोन पक्षांची मतांची टक्केवारी भाजपपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करण्यााठी आघाडीची गरज आहे. आम्ही एकत्र बसून, याबाबत निर्णय घेऊ असे यादव यांनी स्पष्ट केले.सामाजिक न्यायासाठी कटीबद्ध असलेल्या पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे लालूप्रसाद यांनी स्पष्ट केले.