जुलै अखेरीसही देशभरात पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांना यंदा भरघोस उत्पादन घेण्याची संधी आहे. सुमारे दशकभरानंतर सर्वोत्तम सरासरी नोंदविल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुलैमध्ये सरासरी ७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेल्या या पावसामुळे गेल्या दोन वर्षांतील तूट भरून काढणे शक्य होणार आहे. या पावसामुळे रब्बी मोसमातील पिकांना फायदा होणार आहे. सुमारे दशकभरानंतर पावसाने सर्वोत्तम सरासरी नोंदविली आहे. मागील काही वर्षांमध्ये आयात कराव्या लागलेल्या उत्पादनांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने २७०.१ दशलक्ष टन उत्पादन घेण्याचे ध्येय निश्चित केले होते. गतवर्षीच्या तुलनेत हे सात टक्के अधिक आहे. तेलबियाणांखालील मोठे क्षेत्र असून यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. अपघात विमा योजनेला चहा उत्पादकांचा प्रतिसाद आसामसह ईशान्येकडील इतर राज्ये तसेच पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, हिमाचल प्रदेश या राज्यांत चहा मंडळाने लहान चहा उत्पादकांसाठी सुरू केलेल्या अपघात विमा योजनेस शेतकऱ्यांनी उत्साही प्रतिसाद दिला आहे. चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे १८ ते ७० वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या विमा योजनेत चहा उत्पादक विमाधारकाची ७५ टक्के रक्कम चहा मंडळाकडून देण्यात येणार आहे. तर २५ टक्के रक्कम शेतकऱ्याकडून घेण्यात येईल.