* पांढरी माशी व लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने दक्षिण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. * यंदाचा हंगाम वेळेवर सुरू होणार असल्याने साखर उद्योग सुखावला असला तरी ऊस उत्पादकांपुढे या किडीचा सामना करण्याचे मोठे आव्हान आहे. * कोल्हापूर आणि सांगलीतील संपूर्ण ऊस पट्टय़ात लोकरी मावा व पांढऱ्या माशीने थैमान घातले आहे. दोन्ही जिल्ह्य़ांतील प्रत्येक ऊस क्षेत्रावरील दहा टक्के क्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव आहे. * त्यामुळे या भागातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. * मागील महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण महाराष्ट्रातील ऊस पीक संकटात सापडले आहे. * राज्यात १ नोव्हेंबरपासून ज्वारी, मका खरेदी’ * राज्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या ज्वारी आणि मका उत्पादनाला चांगला भाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्या अनुषंगाने पणनच्या माध्यमातून १ नोव्हेंबरपासून ज्वारी व मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. * कांद्याला जादा भाव देण्यासाठी शासनाकडून येत्या पाच वर्षांत सुमारे १५ लाख चाळी उभारण्यात येतील. तसेच, कापसालाही भाव देण्यात येईल, असे आश्वासनही खोत यांनी दिले. * जलयुक्त शिवारच्या योजनेमुळेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविणे शक्य झाले आहे, असेही खोत म्हणाले.