गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता, पण पीक वाचवायचे कसे, हा प्रश्न सर्वानाच होता. अचानक गारपीट सुरू झाली आणि होत्याचे नव्हते झाले. रब्बी हंगामातील पिकांबरोबरच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.  लातूर, रेणापूर या दोन तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका मोठय़ा प्रमाणावर बसला. तालुक्यातील माटेफळ, खुंटेफळ, भिसेवाघोली व रेणापूर तालुक्यातील बीटरगाव, सुमठाना परिसरात गारांचा पाऊस झाला. औसा तालुक्यातील भादा, रेणापूर तालुक्यातील पानगाव, कारेपूर, कामखेडा, भोकरंबा, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, उदगीर तालुक्यातील वांजरवाडा परिसरात गारांचा पाऊस झाला.

कधी दुष्काळ तर कधी गारपीट हे दुष्टचक्र थांबत नसल्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या प्रमुख पिकांसह टोमॅटो, मिरची पिकाचे व आंब्याचे नुकसान झाले.  हरभऱ्याचे घाटे पावसाने व गारांनी गळून रानोमाळ झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आंब्याला या वर्षी चांगला मोहोर आला होता. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने संपूर्ण मोहोर गळून पडल्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Solapur District, Unseasonal Rain, Winds, Damage, lightning, one girl and 2 animals died, Unseasonal Rain in Solapur, solapur unseasonal rain, damage crops, farmers, solapur news,
सोलापूर व ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे नुकसान
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?