मुसळधार पावसामुळे नाशिक-मुंबई मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचल्याची माहिती आहे. रस्ता खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

जुन्या कसारा घाटातील आंबा पॉईंटच्याजवळ 500 मीटरचा रस्ता खचला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेल्याचे दिसून आले. परिणामी सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिस खचलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून पोलीस वाहनधारकांना मार्गदर्शन करत आहे. घाटातील वाहतूक एकेरी मार्गे सुरू आहे. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून घाटातील रेल्वे व रस्ता मार्गावरील दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत.

दरम्यान, ही घटना समजल्यानंतर कसारा महामार्ग पोलीस आणि शहापुरचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. पोलीस बॅरिकेट्स लावून वाहनधारकांना मार्गदर्शन करत आहे. परिणामी येथील वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे.