राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची निर्धार रॅली कर्जत येथे आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार डेंग्यु झाल्यामुळे माध्यमांपासून लांब होते. परंतु, गेल्या दोन तीन दिवसांपासून ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असून आज त्यांनी कर्जत येथे जाहीर सभाही झाली. यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेण्यामागचं कारणही विषद केलं.

अजित पवार म्हणाले की, मधल्या काळात काही राजकीय बदल झाले. त्याबाबत बराच उहापोह झाला. सगळ्यांना सांगायचं आहे की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या जिल्ह्यात समुद्रकिनारा आहे. डोंगराळ भाग आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. रेल्वे गेली आहे. रस्त्यांचं जाळं निर्माण झालं आहे. पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ व्हावं. अनेक मह्तत्वाच्या भागांना जोडणारं काम होत आहे. पुणे, नगर जिल्ह्यांतून घाटातून येताना लोकांना त्रास होतो. तेथेही काही व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इथल्या लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे.

congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
Aditya Thackeray criticized the Shinde government
शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
Mahant Ramgiri Maharaj and Jitendra Awhad
Mahant Ramgiri Maharaj: “महंत रामगिरी महाराज यांनी मुद्दामहून…”, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

“आम्ही राजकारणात ३०-३५ वर्षे काम करत आहोत. पर्यटनाला चालना दिली तर सर्वाधिक रोज स्थानिकांना मिळतो. प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. गेल्या साडेनऊ वर्षांत भारताच्या जनतेसाठी योजना जाहीर केल्या आहेत. या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत”, असंही अजित पवार म्हणाले.

“काहीजण विचार करत असतील की ही भूमिका का घेतली? आम्ही साधू संत नाही. अनेक वर्षे अनेक सरकारमध्ये आम्ही काम केलं. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत जातात. परंतु, आपली विचारधारा सोडत नाहीत. या निर्धार सभेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगतो की, आमची विचारधारा स्पष्ट आहे. अल्पसंख्याक, मागासवर्गीय आदिवासी समाज असेल, सर्वसाधारण समाज असेल कोणत्याही समाजाला आपआपल्या समाजात एकोपा राहावा ही भूमिका युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी घेतली होती. आणि स्वराज्याची स्थापना केली. त्याच रस्त्याने आमच्या सगळ्यांच्या जाण्याचा प्रयत्न आहे, असंही अजित पवार म्हणाले.