बेळगावसह सीमाभागातील मराठीबहुल ८६५ गावांसाठी महाराष्ट्र सरकारनं आरोग्य विमान योजना राबविण्याची घोषणा केली आहे. पण, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या राज्यात प्रवेश करू नये, असा इशारा दिला आहे. यावरून पुन्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागाचा मुद्दा तापणार आहे. अशातच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सीमाभागातील मराठीबहुल गावांतील नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याची घोषणा महायुती सरकारने अर्थसंकल्पात केली होती. अलीकडेच याबाबत अध्यादेश जारी करून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापू शकतं.

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”

सिद्धरामय्या काय म्हणाले?

“आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा केली आहे. तेथील अधिकाऱ्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे कळविले आहे,” असं सिद्धरामाय्यांनी बुधवारी म्हटलं होतं.

“सीमावर्ती भागातील लोकांकडे दुर्लक्ष”

यावर अशोक चव्हाण म्हणाले, “सरकारनं पहिलं राज्यात लक्ष दिलं पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कर्नाटकात जाण्यापेक्षा राज्यातील सीमावर्ती भागावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. सीमावर्ती भागातील लोकांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. तसेच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केलेलं वक्तव्य चुकीचं नाही.”

दरम्यान, सिद्धरामय्या यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सीमाभागातील मराठीभाषकांचे लक्ष लागले आहे.