महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी (११ डिसेंबर) भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा देतो आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो, असं आव्हान भास्कर जाधव यांनी भाजपाला दिलं. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही भास्कर जाधवांनी भाजपावर केली. यावर आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय जनता पार्टी अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री करणार नाही. त्यांनी अजित पवारांचा वापर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी केला. त्यामुळे भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपरोधिक विधान केलं, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Eknath Shinde Sanjay Raut
नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? संजय राऊत राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत
now expelled Bikaner unit president Usman Gani
पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!

यावेळी वैभव नाईक म्हणाले, ” भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा वापर करून घेते. भाजपाने गेली २५ वर्षे शिवसेनेचा वापर केला. उद्धव ठाकरे यांनी पुढे शिवसेनेचा वापर करू दिला नाही, म्हणून आमची युती तुटली. तसेच भाजपा अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यास इच्छुक होती. अनेकदा बोलणीही झाली.”

हेही वाचा- “अजित पवारांना मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो अन्…”, भास्कर जाधवांचं भाजपाला आव्हान

“भाजपाने अजित पवार यांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी केला आहे. त्यामुळे अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही. कारण लोकांमध्ये असलेला नेता भाजपाला आवडत नाही आणि परवडत नाही, हे अनेकदा आपण बघितलं आहे. त्यांना फक्त त्यांच्या ताटाखालचे मांजर पाहिजे असतात. त्यामुळे ते अजित पवारांना कदापि मुख्यमंत्री करणार नाहीत. त्यामुळे भास्कर जाधव यांनी उपरोधिकपणे विधान केलं आहे,”असंही वैभव नाईक म्हणाले.