गेल्या १७ दिवसांपासून चालू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून शिष्टमंडळानं आधीच मनोज जरांगे पाटलांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा केली होती. शेवटी मराठा आरक्षणासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी देण्याचंही मनोज जरांगे पाटलांनी मान्य केलं. मात्र, स्वत: मुख्यमंत्री भेटायला आल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी सराटी गावात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं.

“मी तुम्हाला उपोषण सोडण्याची विनंती केली आणि तुम्ही माझ्या हातून सरबत घेतलं यासाठी तुमचे व तुमच्या सहकाऱ्यांचे धन्यवाद. शासनाची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वीही सरकारने मराठा समाजाला १६ व १७ टक्के आरक्षण दिलं होतं. त्यावेळी आपण अध्यादेश काढला, तेव्हा उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली.नंतर आपण कायदा केला. १२ व १३ टक्के आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयातही टिकला. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झालं. ते का झालं, कसं झालं यावर मी बोलू इच्छित नाही”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

aap replied to delhi lg vk saxena
“तुम्ही काय बोलताय, ते तुम्हाला तरी कळतंय का?” नायब राज्यपालांच्या ‘त्या’ आरोपाला आम आदमी पक्षाचे प्रत्युत्तर!
eknath shinde criticized opposition
“वाघनखांवर आक्षेप म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा अपमान”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “काही लोक…”
Jitendra Awhad, Eknath shinde, Jitendra Awhad give statement about Eknath shinde, funds distributio, Jitendra Awhad criticise ajit pawar, thane news, latest news,
तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे होते, अजितदादांनी मला हरविण्याचा प्रयत्न चालवला; जितेंद्र आव्हाड यांची टोलेबाजी
arvind kejriwal health
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?
ias pooja khedkar, ias pooja khedkar news,
आयएएस पूजा खेडकर प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे विधान; म्हणाले, “दोषी आढळल्यास त्यांना…”
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
Nobody will be spared in run and hit case says Chief Minister Eknath Shinde
“रन अँड हिट प्रकरणात कोणालाही पाठीशी घेतली जाणार नाही…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
India boycott of PM speech Modi Dhankhad criticize opponents
सभात्यागामुळे सत्ताधाऱ्यांना बळ; पंतप्रधानांच्या भाषणावर ‘इंडिया’चा बहिष्कार; मोदी, धनखड यांची विरोधकांवर टीका

“मी म्हणालो, जे होईल ते होईल, पण…”

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा करून त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. माध्यमांशी बोलताना राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या भूमिकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुनरुच्चार केला. “मराठा आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. पण मराठा आरक्षण रद्द झालं, तेव्हा ३ हजार ७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या. पण नोकऱ्या मिळाल्या नव्हत्या. पण त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कुणी करत होतो. पण मी सांगितलं, जे होईल त्याला तोंड देण्याची जबाबदारी सरकारची व मुख्यमंत्री म्हणून माझी आहे. त्यांना आपण नोकऱ्या देऊ. आम्ही नोकऱ्या दिल्या. ते आता नोकरीवर आहेत”, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी नमूद केलं.

“मी अनेक वर्षं मनोजला ओळखतो, त्यानं…”

यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीयही आंदोलनस्थळी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटलांच्या वडिलांनाही एकनाथ शिंदे यांनी ज्यूस प्यायला दिला. यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांचे आभार मानले. “मी त्यांच्या बाबांना सांगितलं मघाशी, तुमचा पोरगा भारी आहे. स्वत:साठी नाही, समाजासाठी तो लढतोय. मनोजला मी गेली अनेक वर्षं ओळखतो. त्यानं कोणताही प्रश्न वैयक्तिक फायद्यासाठी कधी मांडला नाही. जेव्हा जेव्हा तो मला भेटला, त्या त्या वेळी मराठा समाजाबद्दल, आरक्षणाबद्दल त्यानं सरळ भूमिका मांडली. मी मनोजचं मनापासून अभिनंदन करतो”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“दिल्लीत मला विचारलं, ये मनोज जरांगे कौन है”, एकनाथ शिंदेंनी ‘तो’ किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये हशा…

“एखादं आंदोलन करणं आणि आमरण उपोषण करणं, जिद्दीनं ते पुढे नेणं आणि त्याला जनतेचा प्रतिसाद मिळणं या गोष्टी कमी वेळा पाहायला मिळतात. पण ज्याचा हेतू शुद्ध असतो, प्रामाणिक असतो, त्याच्या मागे जनता खंबीरपणे उभी राहाते. त्यामुळेच पहिल्या दिवसापासून लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला व मराठा आरक्षणाची प्रामाणिक भूमिका घेऊन तुम्ही लढत आहात.