दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना जगण्याचा अधिकार नसल्याचे परखड प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शनिवारी येथे केले, त्या एका उपग्रह वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. या घटनेची गणना दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरणाशी होत असल्याने या क्रूरकम्र्याना जगण्याचा काहीएक अधिकार नाही, असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले. बलात्काऱ्यांना सरसकट फाशीची शिक्षा ठोठवावी की नाही, याबाबत संसद आणि कायदेपंडितांनी विचारविनिमय करावा, अशा घटना टाळण्यासाठी समाजाची व प्रामुख्याने पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.