नागपूरमध्ये पहिल्यांदाच ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. अवघ्या चार तासांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी चार ते पाच फूट पाणी साचले. पंचशील चौक परिसरात रुग्णालयांची संख्या अधिक असून अनेक रुग्णालयांमध्येदेखील पाणी शिरले. तसेच शंकरनगरातील वोकहार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिटही पाण्याखाली गेले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी परिस्थितीची माहिती देताना यात दुर्दैवाने एका आजींचा मृत्यू झाल्यांचंही सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपूरमध्ये जवळपास ४ तासांमध्ये १०९ मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला. त्यातील ९० मिलीलीटर पाऊस केवळ दोन तासात झाला आहे. त्यामुळे पावसाची प्रचंड तीव्रता पाहायला मिळाली. यामुळे आंबाजरी तलाव भरून पाणी वाहिलं. हे अतिरिक्त पाणी नाग नदीतून वाहतं. त्यामुळे नाग नदीला मोठ्या प्रमाणात पूर झाल्याची स्थिती निर्माण झाली.”

254 people were rescued by the fire brigade in the flooded areas pune
रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग; २५४ जणांची अग्निशमन दलाकडून सुटका
Malegaon Bomb Blast Case Final Argument Begins Today Mumbai
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण :आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात, खटल्याची सुनावणी शेवटच्या टप्प्यात
chandipura virus surge in gujarat
चांदीपुरा व्हायरसचा कहर; ५ दिवसांत ६ मुलांचा मृत्यू, हा व्हायरस किती घातक? काय आहेत याची लक्षणे?
Gang, robbers, Kharghar,
खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी सक्रिय
Ayodhya Women Falls In Pothole Viral Video
अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
2 killed in tree fall incidents in mumbai in two consecutive days
परेल येथे झाड पडून महिला ठार; दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू
uttar pradesh stampede at religious event
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ८७ जणांचा मृत्यू; तीन चिमुकल्यांसह महिलांचाही समावेश
ladki bahini yojana, Yavatmal,
यवतमाळ : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी बहिणींची उसळली गर्दी; ढिसाळ नियोजनामुळे सर्वत्र गोंधळ…

“नाग नदीच्या किनाऱ्यावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं”

“नाग नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. आंबाजरी ले आऊट, वर्मा ले आऊट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगरपासून पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर आणि नंदनवनपर्यंत नाग नदीच्या दोन्ही बाजूला पाणी शिरलं. तळ मजल्यात तर पाणी शिरलंच, पण अनेकांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं,”

“एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सैन्याच्या मिळून ६ टीम तैनात”

नागपूरचं मुख्य बसस्थानक असलेल्या मोरभवन येथे तर बसमध्ये पाणी शिरलं. त्या ठिकाणी प्रशासन तत्काळ कार्यरत झालं. नागपूरचे महापालिका आयुक्त, नागपूर जिल्हाधिकारी आणि संपूर्ण प्रशासकीय टीम तेथे कार्यरत होती. तत्काळ दोन एनडीआरएफच्या टीम, दोन एसडीआरएफच्या टीम आणि दोन सैन्याच्या टीम अशा ६ टीम तैनात करण्यात आल्या.

“दुर्दैवाने एका आजींचा मृत्यू”

जवळपास ४०० नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. आता पाणी हळूहळू ओसरत आहे. मात्र, अद्यापही बऱ्याच भागांमध्ये पाणी पाहायला मिळत आहे. यात दुर्दैवाने एका आजींचा मृत्यू झाला आहे.

“एकूण १४ जनावरांचा मृत्यू झाला”

शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासन पूर्णपणे जागरूक आहे. पाहणी करून पंचनामे करणं, तात्पुरती मदत असं काम सुरू आहे. याशिवाय एकूण १४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लोकांना आमचं एकच आवाहन असणार आहे की, कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रशासन पूर्णपणे जागरूक आहे. कुठलीही अडचण असेल तर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा.