राज्यातील विजेचे दर व दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत आता  फेरविचार करावाच लागेल, असे परखड मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी नागपुरात व्यक्त केले. यावरून राज्यातील वीजपुरवठय़ाची स्थिती गंभीर असल्याचेच संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विजेच्या दराचा पुनर्विचार केला जाणार आहे काय, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात शेतीसाठी मोठय़ा प्रमाणात कमी दरात वीज दिली जाते. एकूण साडेदहा हजार कोटी रुपयांची सवलत विजेच्या दरात दिली जात आहे. परिणामी राज्यात विजेचा दर जास्त आहे, हे मान्य करावे लागेल, पण राज्यात २४ बाय ७ वीजपुरवठा केला जातो, हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. शेजारील एक-दोन राज्यांतच विजेचा दर कमी असून सौर ऊर्जेचा पर्याय आता स्वीकारण्याची वेळ आली आहे. परळी वीज केंद्र बंद पडले आहे, गॅसअभावी दाभोळ प्रकल्प बंद आहे. मोठय़ा प्रमाणात पेट्रोलियम तेल आयात करावे लागत आहे. अशा परिस्थितीतपण आता विजेचा दर व सवलतींबाबत सारासार विचार करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity rate and concession re think time is came cm
First published on: 26-02-2013 at 04:31 IST