अहमदनगरमधील कोपर्डीत येथे १५ फुट खोल बोअरवेलमध्ये पडल्याने एक पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खेळत असताना ही घटना घडली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून सुरू होते. मात्र, या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

हेही वाचा – “शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे शांत का?”, संजय राऊतांचा सवाल; म्हणाले, “बदनामी ही फक्त…”

Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, सागरचे कुटुंब उसतोडणीसाठी मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात आले होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या ऊसाच्या शेतात ते कामाला होते. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सागर खेळत असताना शेतातील बोरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सारगला वाचवण्यासाठी समांतर दोन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आलं. त्याला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच सागरचा दुर्देवी मृत्यू झाला.

हेही वाचा – वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”

दरम्यान, २०१७ मध्येही अशाच प्रकारची एक घटना अहमदनगरमध्ये घडली होती. त्यावेळी ७ वर्षांचा एक मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला होता. गेला काही वर्षात बोअरवेलमध्ये पडून अशा प्रकारे अनेक चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याबाबत प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.